श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात 35 जणांचे रक्तदान

B1न्युज मराठी नेटवर्क
बार्शी : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. त्यानुसार गुळपोळी (ता. बार्शी) येथील श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाने मंगळवारी (ता. १४ ) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला महिलांसह गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत ३५ जणांनी रक्तदान केल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा चिकणे यांनी दिली.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन गावच्या सरपंच शुभांगी नरखडे, स्वाती चिकणे, अश्विनी चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ हे मागील १३ वर्षांपासून गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे.
यावेळी सरपंच शुभांगी नरखडे, माजी सरपंच दत्तात्रय काळे, उपसरपंच बाळासाहेब चिकणे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चिकणे, कैलास काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष चिकणे, भैरवनाथ अँग्रोचे श्रीकृष्णा माचाले, धनाजी मचाले, धनंजय चिकणे, गणेश म्हेत्रे, नागेश बारवकर, लक्ष्मण काळे, योगेश चिकणे, प्रवीण चिकणे, प्रवीण बारवकर, परमेश्वर चिकणे, अश्विनी कृष्णा चिकणे, स्वाती सतिश चिकणे, दत्तात्रय चिकणे, सुनील फुरडे, बालाजी बारवकर मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरास इंडियन रेडक्रॉस सोसायटी, उपशाखा बार्शी संचलित श्रीमान रामभाई शाह यांनी सहकार्य केले.