आमदार राजेंद्र राऊत यांच्या यशस्वी प्रयत्नाने बार्शी तालुक्यातील सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

0

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांनी बुधवार दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी या जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांच्याशी पत्र व्यवहार करून खरीप हंगाम सन २०२१-२२ मधील, बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान याबाबत माहिती देऊन, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे ते या विषयासंबंधी जिल्हाधिकारी यांच्याशी सतत फोनवर संपर्कात होतो.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या या पाठपुराव्यामुळे बार्शी तालुक्यातील सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२१-२२ प्रतिकूल परिस्थिती जोखीम अंतर्गत सोयाबीन पीक विमा धारक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून २५% आगाऊ नुकसानभरपाई रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या कडून आज पारित करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या