वाळुज गाव वृक्षारोपण लागवड व संगोपन मध्ये वाळुज राज्यात आघाडीवर राहील – अँड.जाधव

सोलापूर- रक्तदान जसे जिवनदान आहे तसे वृक्षलागवड,संगोपन व संवर्धन करणे ही सध्या काळाची गरज आहे.वाळुज ग्रामपंचायतीने आजवर 1100 वृक्ष लागवड केली असुन आज शतक वृक्ष लावून सह्याद्री देवराईच्या मोहिमेत सहभागी होणारे पहिले गाव ठरले आहे.ग्रामपंचायतीने हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून आजवर 1200 वृक्ष लावणारे वाळुज गाव राज्यात आघाडीवर राहील असे सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अँड विकास जाधव यांनी सांगितले. सरपंच परिषद मुंबई-महाराष्ट्र,सह्याद्री देवराई व ग्रामपंचायत वाळुज यांच्या संयुक्त विद्दमाने स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झाडाचे शतक वृक्ष लागवड कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अँड विकास जाधव व महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक पंडीत ढवण भोयरेचे सरपंच बालाजी साठे,सौदरे सरपंच शिवशंकर ढवण,वाळुज सरपंच सौ.प्रियंका खरात, डाँ. गणेश खरात,उपसरपंच दिनकर कादेसर, प्राजक्ता टेकाळे आदि मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचे संकटात आँक्सीजनची टंचाई निर्माण झाली. निसर्गाचा समतोल बदलला आहे, पुर,दरडी कोसळणे अशी संकटाची मालीका सुरु आहे.यासाठी वृक्षारोपण, लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे.वाळुज ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या बांधावर फळांची व रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावुन जतन करण्याचे ध्येय घेतले आहे.हा कौतुकास्पद उपक्रम असुन वाळुज गाव राज्यात आघाडीवर राहील असे अँड जाधव यांनी सांगितले. सरपंच परिषद पदाधिकारी व सह्याद्री देवराईचे अभिनेते सयाजी शिंदे, यांच्या समवेत पुणे येथे झालेल्या बैठकीत एक पद ..झाडाचे शतक मोहीम राबवण्याचे ठरले यामध्ये आमच्या सहकारी डाँ. प्रियंका खरात यांनी वाळुज गावात आजवर 1200 वृक्षलागवड करुन वाळुज गाव हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गाव ठरेल असे महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील यांनी सांगितले. वाळुज गावचे सुपुत्र स्व. सुशांत कादे यांना अभिप्रेत असलेले वाळुज विकासात्मक गाव करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहू असे सरपंच सौ.प्रियंका खरात यांनी सांगुन नागरीकांचे मदतीने आम्ही आजवर लावलेली 1200 वृक्ष निश्चित जोपासू असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी धनवेसर,तुकाराम पाटील, मोटे सर,ग्रामसेवक जाधव आदि उपस्थित होते.सोलापूर- रक्तदान जसे जिवनदान आहे तसे वृक्षलागवड,संगोपन व संवर्धन करणे ही सध्या काळाची गरज आहे.वाळुज ग्रामपंचायतीने आजवर 1100 वृक्ष लागवड केली असुन आज शतक वृक्ष लावून सह्याद्री देवराईच्या मोहिमेत सहभागी होणारे पहिले गाव ठरले आहे.ग्रामपंचायतीने हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून आजवर 1200 वृक्ष लावणारे वाळुज गाव राज्यात आघाडीवर राहील असे सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अँड विकास जाधव यांनी सांगितले.
सरपंच परिषद मुंबई-महाराष्ट्र,सह्याद्री देवराई व ग्रामपंचायत वाळुज यांच्या संयुक्त विद्दमाने स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झाडाचे शतक वृक्ष लागवड कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अँड विकास जाधव व महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक पंडीत ढवण भोयरेचे सरपंच बालाजी साठे,सौदरे सरपंच शिवशंकर ढवण,वाळुज सरपंच सौ.प्रियंका खरात, डाँ. गणेश खरात,उपसरपंच दिनकर कादेसर, प्राजक्ता टेकाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाचे संकटात आँक्सीजनची टंचाई निर्माण झाली. निसर्गाचा समतोल बदलला आहे, पुर,दरडी कोसळणे अशी संकटाची मालीका सुरु आहे.यासाठी वृक्षारोपण, लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे.वाळुज ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या बांधावर फळांची व रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावुन जतन करण्याचे ध्येय घेतले आहे.हा कौतुकास्पद उपक्रम असुन वाळुज गाव राज्यात आघाडीवर राहील असे अँड जाधव यांनी सांगितले.
सरपंच परिषद पदाधिकारी व सह्याद्री देवराईचे अभिनेते सयाजी शिंदे, यांच्या समवेत पुणे येथे झालेल्या बैठकीत एक पद ..झाडाचे शतक मोहीम राबवण्याचे ठरले यामध्ये आमच्या सहकारी डाँ. प्रियंका खरात यांनी वाळुज गावात आजवर 1200 वृक्षलागवड करुन वाळुज गाव हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गाव ठरेल असे महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील यांनी सांगितले.
वाळुज गावचे सुपुत्र स्व. सुशांत कादे यांना अभिप्रेत असलेले वाळुज विकासात्मक गाव करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहू असे सरपंच सौ.प्रियंका खरात यांनी सांगुन नागरीकांचे मदतीने आम्ही आजवर लावलेली 1200 वृक्ष निश्चित जोपासू असा आत्मविश्वास व्यक्त केला.
यावेळी धनवेसर,तुकाराम पाटील, मोटे सर,ग्रामसेवक जाधव आदि उपस्थित होते.