लोहा,कंधार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी वंचितने केली नुकसानग्रस्त तात्काळ आर्थिक मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क
लोहा: कंधार तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे लोहा, कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताला आलेली रब्बीची पिके आता उद्धवस्त झाले असून अनेक फळभाज्या व इतर महत्त्वाची पिके ज्यात हरभरा, गहू या पिकांसह उन्हाळी ज्वारी अधीसह हंगामी फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत व तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या नेतृत्वात लोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक गावात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्तांना शासनाने ताबडतोब मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या नेतृत्वात आज लोहा तालुक्यातील अनेक गावात पाहनी दौरा करण्यात आला व शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. तालुक्यातील शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाकडे अनेक तक्रार केल्या असून प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचेही बोलले जात आहे. वेळीच शेतकऱ्यांना मदत झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही लोहा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. आज लोहा तालुक्यातील अनेक गावात वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगरूळ येथे शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात आर्थिक मदत करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व शासन दरबारी ही मागणी लावून धरून न्याय मिळवून देण्याची हमी दिली : यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया हाके , तालुका अध्यक्ष सतीश आनेराव, सरपंच किरण हाके, उपसरपंच नरहरी शिंदे, धोंडीबा यांनभूरे, झगन हटकर, सर्कल प्रमुख तुकाराम बेरळे, सिद्धार्थ ससाने व शेतकरी उपस्थित होते.