सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार शासनाचा ऐतिहासिक निर्णय.. सरपंच परिषदेच्या लढ्याला यश… ॲड विकास जाधव प्रदेश सरचिटणीस सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असा शासनाने निर्णय जाहीर केला व राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी या निर्णयाचे स्वागत केले सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता काकडे प्रदेश सरचिटणीस ॲड विकास जाधव विश्वस्त राजीव पोतणीस आनंद जाधव प्रशिद्धी प्रमुख बापू जगदाळे यांच्यासह सर्व राज्यातील विश्वस्त जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी सातत्याने लावून धरली होती. अनेक ठिकाणी आंदोलने केली होती दिनांक ११/७/२०२१ रोजी संपूर्ण राज्यात दत्ता काकडे व ॲड विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन या टप्प्यातील निवडणुका पूर्वी थेट जनतेतून सरपंच निवडीचा कायदा अमलात आणून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती.
राज्यातील 300 तहसील कार्यालयातून निवेदन देण्याचा उपक्रम हाती घेतला होता राज्यातील सर्व तहसील मधून शासनाला रिपोर्ट केले त्याप्रमाणे शासनाने सरपंच परिषदेच्या मागणीचा विचार करून थेट जनतेतून सरपंच निवडी निवड होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला या निर्णयाचे सर्व राज्यातून सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यात मधून स्वागत होत आहे.
तसेच बार्शी या ठिकाणी व सोलापूर जिल्ह्यात सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अर्पण करून सरपंच परिषदेच्या विजयाच्या घोषणा दिल्या व पेढे वाटून निर्णयाचे स्वागत केले तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे जाहीर अभिनंदनही केले.
यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट विकास जाधव शिवशंकर धवन, सुधीर गायकवाड विकास माने, दादासाहेब विधाते ,सचिन गोसावी ,विजय ठोंगे ,अशोक जाधव ,चैताली आंधळकर ,नितीन मंडलिक ,सुधाकर पंडित मिरगणे, अक्षय काशीद, पपु टेकाळे करण मोरे अशोक जाधवर डॉ लक्ष्मण जाधवर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.