आयुष्मान कार्ड ई-केवायसीसाठी विशेष मोहिम९ ते २३ डिसेंबर दरम्यान गावोगावी मोहीम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : दि.८ डिसेंबर : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याकरीता जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात सध्या १५.२३ लक्ष लाभार्थी असून त्यापैकी ६.८० लक्ष लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी झालेले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आशा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान चालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी २० रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी १० रुपये,असे एकूण ३० रुपये मानधन स्वरूपात देण्याबाबत शासन निर्णय पारित झाला आहे.

या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सुविधा १३५६ आजारांवर उपलब्ध आहे.हा लाभ धाराशिव जिल्ह्यातील २७ खाजगी व १३ शासकीय अशा एकूण ४० रुग्णालयांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सुमारे २३०० शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये घेता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र,CSC केंद्र,आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत मोफत आयुष्मान कार्ड काढून देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा,तसेच ७० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांनी आयुष्मान वय वंदना कार्ड काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.

ही विशेष मोहिम ९ डिसेंबर २०२५ पासून २३ डिसेंबर २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.या कालावधीत नमूद कर्मचारी गाव, वार्ड,वाडी,वस्ती,शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन आयुष्मान कार्डची ई-केवायसी करणार आहेत. तसेच लाभार्थ्यांना स्वतःचे ई-केवायसी स्वतः करता यावे, यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.अँड्रॉईड मोबाईलमध्ये आयुष्मान अ‍ॅप डाऊनलोड करून अ‍ॅपमधील ‘बेनिफिशरी’ बटनवर क्लिक करून लाभार्थी स्वतःचे ई-केवायसी कार्ड काढू शकतात. तसेच आपल्या गावातील ग्रामपंचायत, CSC केंद्र,आशा स्वयंसेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधूनही ई-केवायसी करून घेता येणार आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान कार्डची ई-केवायसी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय नियोजन करून राबविण्यात येत आहे.सर्व विभागांच्या समन्वयातून व सहकार्याने डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची १०० टक्के आयुष्मान कार्ड ई-केवायसी पूर्ण करण्यात येणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या