आरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी स्वामी

0

२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपतीसंभाजीनगर : कोणतेही आरोग्य अभियानात गावातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असतो. त्याशिवाय त्या अभियानाला यश येत नाही. चांगल्या आरोग्याचे नागरिक ही विकासाची पूर्व अट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आरोग्य अभियान राबवून त्याचे १०० टक्के निर्मूलन होणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकार दिलीप स्वामी यांनी आज केले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरी करण कार्यक्रमांतर्गत आज टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या अभियानात ३२८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ३०४ ग्रामपंचायती कांस्य पदकासाठी पात्र ठरल्या, तर सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधी रजत सन्मान’ प्रदान करण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.वैशाली डिकले तसेच सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आरोग्याचा विषय हा स्वच्छतेशी निगडीत आहे. कोणत्याही आजारांविषयीचे अभियान गावात आरोग्य विभागामार्फत राबविले जाते त्या अभियानात गावकऱ्यांनी सहभागी होऊन अशा आजारांचे १०० टक्के निर्मूलन करण्यात योगदान दिले पाहिजे. केवळ पुरस्कार मिळणार म्हणून अभियानात भाग घेऊ नका. तर अशा अभियानाचे जे सर्वंकष फायदे असतात त्याचाही विचार करा. टीबीमुक्त ग्रामपंचायतीसाठी काम करतांनाच ग्रामस्थांनी बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, बालकामगार, कुपोषण अशा प्रश्नांवरही एकत्र येऊन लढा दिला पाहिजे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितले की, ज्या समाजाचे आरोग्य चांगले तो समाज सर्वच क्षेत्रात प्रगती करतो. त्यामुळे आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या अभियानांमध्येसर्व गावकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे. तसेच अशा अभियानांमध्ये गावातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. आपले गाव टीबी मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे,असे आवाहन त्यांनी केले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजीत या सोहळ्यात क्षयरोग निवारण मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३२८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ३०४ ग्रामपंचायती कांस्य पदकासाठी पात्र ठरल्या, तर सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधी रजत सन्मान’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण ८६८ ग्रामपंचायतींमध्ये ५९,१३८ संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली होती. यामधून ५४४ ग्रामपंचायतींमध्ये १,५०६ क्षयरुग्ण आढळले, अशी माहिती जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. वैशाली डिकले यांनी प्रास्ताविकात दिली.यावेळी ग्रामपंचायती, उत्कृष्ट कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांनाही सन्मानीत करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या