बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन महिलांनी आंदोलनात अग्रेसर राहावे
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाली. बुद्धगया येथील बोधिवृक्षाखाली तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली.त्या बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे परमपवित्र जागतिक श्रद्धास्थान आहे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट चा 1949 चा टेंपल ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार ट्रस्ट मध्ये सर्व सदस्य हे बौद्ध असले पाहिजेत असा बिहार च्या विधानसभेत कायदा केला पाहिजे. यासाठी आपण बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लवकरच भेटणार आहोत.
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभर बौद्धांचे आंदोलन सुरू आहे.त्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा कृतिशील पाठिंबा आहे.राज्यात रिपब्लिकन पक्षाचे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू असून या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात रिपब्लिकन महिलांनी अग्रेसर व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दिना निमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.या महिला मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर ना.रामदास आठवले यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले आणि महिला मेळाव्याचे आयोजक उषाताई रामलू ; रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि रियाब्लिकन पक्षाच्या सर्व महिला नेत्या पदाधिकारी उपस्थित होते.
जागी होत आहे गावागावातील नारी मग का येणार नाही तुमची सत्तेमध्ये बारी तुम्हाला करावी लागेल दीक्षाभूमीची वारी त्या शिवाय पुढे येणार नाही बौद्ध समाजाची नारीअशी कविता सादर करून न. रामदास आठवले यांनी महिलांनी आपल्या जिल्ह्यात तालुक्यात रिपब्लिकन महिला आघाडी चे जन संपर्क कार्यालय सुरू केले पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत.ज्येष्ठ नागरिक;वृध निराधार आणि विधवा महिलाना मदत केली पाहिजे.त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ज्या गरिबाना बँकेत खाते खोलता येत नव्हते त्यांच्या साठी जन धन योजना लागू केली. 2014 सालापासून आता पर्यंत 56 कोटी लोकांनी बँक खाती खोलली असून त्यात 56 टक्के महिलांची खाती आहेत. मुद्रा योजनेतून ही 69 टक्के महिलांनी स्वयंरोजगार उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. महिलाना युवा बेरोजगारांना रोजगार उद्योग देण्यासाठी केंद्र सरकार च्या अनेक योजना असून या योजनांचा अभ्यास करून त्याचा लाभ आपल्या परिसरातील गरजूंना मिळवून देण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यास रिपब्लिकन महिलांनी आक्रमक होऊन आंदोलन करावे ; न्याय हक्काच्या ; अन्याय अत्याचार रोखण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात रिपब्लिकन महिलांनी अग्रेसर राहिले पाहिजे असे आवाहन ना.रामदास. आठवले यांनी केले.
नागसेन कांबळे यांचे सुपुत्र डॉक्टर झाल्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबियांचा ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी एका दिव्यांग महिलेने नृत्य सादर केले. दिव्यांग असणाऱ्या नृत्यांगना महिला कलाकाराचा सत्कार ना.रामदास आठवले आणि सौ. सीमाताई आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी महिलांना भोजन दान दिले. सौ. सीमाताई आठवले यांच्या नेतृत्वात झालेल्या या रिपब्लिकन महिला मेळाव्यास फुलाबाई सोनवणे; शिलाताई गांगुर्डे; आशाताई लांडगे; अभया सोनवणे; उषाताई रामलू; नैना वैराट; स्वप्नाली जाधव; अमिना खान; रेशमा खान; सूत्रसंचालन डॉ श्वेता शिलवंत यांनी केले.