कर्मवीरांच्या सहधर्मचारीणी लक्ष्मीबाई जगदाळे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कर्तबगार महिलांचा सत्कार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

लक्ष्मीबाई जगदाळे यांचे चरित्र महिलांसाठी प्रेरणादायी : जोंधळे

लक्ष्मीबाई जगदाळे यांचे चरित्र लेखन होण्याची गरज : डॉ.फडणवीस

बार्शी : कोणत्याही मोठेपणाचे अपेक्षा न करता प्रसिध्दी विन्मुख राहून सर्वस्वाचा त्याग करत समाजासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या पती कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनात एकरूप झालेल्या लक्ष्मीबाई जगदाळे यांच्यासारख्या आदर्श स्त्रीयांचे जीवन चरित्र लेखनाच्या माध्यमातून समाजासमोर आले पाहिजे अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस यांनी व्यक्त केले. येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई जगदाळे यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द लेखीका इंदुमती जोंधळे होत्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देवडवार व खजिनदार जयकुमार शितोळे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयाची संगीत विभागाच्या स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रास्ताविकामध्ये संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी कर्मवीरांचा आदर्शवाद जपत हा संस्था समुह प्रगती पथावर आहे. आधुनिक युगातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असणारे ज्ञानवंत विद्यार्थी निर्माण व्हावेत या विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमठवत सामाजिक जाणिवा जोपासाव्यात हा संस्थेचा दृष्टीकोन आहे. कर्मवीरांच्या जीवन कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंचा मोठा त्याग आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चीरस्मारक म्हणून पुतळा उभारला आहे असे सांगितले. यावेळी आपल्या भाषणात डॉ. फडणवीस यांनी कर्मवीरांच्या कार्यात लक्ष्मीबाई जगदाळेंनी त्या काळात दिलेली साथ मोलाची आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच कर्मबीर समाजासाठी विशाल कार्य करू शकले. लक्ष्मीबाईंच्या जीवनावर साहित्य निर्माण झाले पाहिजेत तसेच प्रबंध लेखनही झाले पाहिजे. त्या लेखनातून लक्ष्मीबाईंच्या कार्याचे महत्व समाज मनावर दसेल. कर्मवीर वक्ष्मीबाई यांच्या कार्याचा विद्यापिठाला अभिमान आहे. त्यामुळे सोलापूर विद्यापिठामध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तसेच कर्मवीरांचे नाव ज्ञानस्रोत केंद्रालाही दिले आहे. यावेळी बोलताना इंदुमती जोंधळे यांनी लक्ष्मीबाईंच्या काळात समाजसेवा सोपी नव्हती, सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिंना समाजाकडून त्रास होत असे. अशा काळात लक्ष्मीबाईंनी कर्मवीरांच्या कार्याचे महत्व ओळखले. त्यांनी खऱ्या अर्थाने अर्धांगिनीची भुमिका बजावली. त्यामुळेच कर्मवीरांच्या बरोबरीने आज त्यांचे पुतळा उभारण्याचे उचित कार्य संस्थेने केले आहे. आधुनिक काळातील महिलांनी शिक्षण आणि स्वावलंबनाची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त भारत घोगरे यांच्या मामांची मुले आणि मुलांचे मामा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या वतीने मळेगाव येथील नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा सखुबाई गडसिंग, अतिशय कष्टातून आपल्या मुलाला जिल्हाधिकारी घडविणाऱ्या विमलताई घोलप, कर्मवीरांच्या संस्थेमध्ये जीवनातील पन्नास वर्षे सेवा करणाऱ्या केशरबाई निकम, अपंग पतीला साथ देणाऱ्या ऋणिता चव्हाण तसेच बँकेमध्ये प्रतिकुल परिस्थितीवर मात करत योगदान दिलेल्या शशिकला गाडे या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेमध्ये पी.एच.डी. संपादन करणाऱ्या गुणवंत प्राध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी यांचाही संस्थेच्या बतीने सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. विष्णू शिखरे व डॉ. एस. बी. बीलेगावकर यांनी करून दिला. यावेळी सत्कारमुर्ती महिलांच्या वतीने प्रातिनिधीक मनोगतामध्ये श्रीमती सखुबाई गरिंग यांनी आपले पती नागनाथ गडसिंग यांनी कर्मवीरांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेत शिक्षण संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. किरण गाढवे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव पी. टी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या