शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा निधी मिळावा या मागणीसाठी गौडगाव येथे तब्बल अडीच तास रस्ता रोको

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : नागोबा चौक गौडगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले गौडगाव आणि उपळे (दु.) मंडळातील ७०० ते ८०० शेतकरी या आंदोलनास उपस्थित होते.तहसीलदार येत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले, तब्बल अडीच तासाने तहसीलदार शेरखाने घटनास्थळी आल्यामुळे आंदोलन समाप्त करण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, सर्कल अधिकारी भगवान मुंडे, कृषी मंडळ अधिकारी स्वाती सांगळे उपस्थीत होते.
शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल सोयाबीन या पिकावर अवलंबून असते,पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीन पिकावर गोगलगायी व किडीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच संततधार पावसामुळे पिकाची वाढ न होणे, पिकाचा फुलोरा गळणे, पिकास कीड लागणे अशा विविध कारणाने सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले आहे.
तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. पंचनामे करूनही २० ते २५ दिवस झाले, तरी अजून पर्यंत पिकाची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. तसेच गौडगांव मंडळामध्ये संततधारा पावसामुळे पिकाचे ८० टक्के नुकसान झाले आहे, त्यामुळे पिक विमा ही नुकसानी प्रमाणे मिळावा.
यावेळी राहुल भड, नाना खडके, दादा जाधवर, भास्कर काकडे, किशोर घोडके, काकासाहेब भड, अनिल भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद भालेकर आणि नामदेव सोनवणे आदींनी शेतकऱ्याच्या व्यथा व्यक्त केल्या.
यावेळी अनिल लाटे, संतोष मंडलिक, सुरेश घोडके, दादा सावंत, सत्यवान भोसले, लक्ष्मण संकपाळ, बालाजी भोंग, रणजित महानवर, हिराचंद शिंदे, मोहन काजळे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.