मालवंडी येथे अवकाळी पावसामुळे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट होऊन 15 लाखाचे नुकसान

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील दीड एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे भुई सपाट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे शनिवारी रात्री विजेच्या कडकटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मालवंडी येथील शेतकरी जनार्दन थोरात गट नंबर 263 या गटामध्ये दीड एकर द्राक्षाची बाग होती वर्षभर काबाडकष्ट करून वेगवेगळी माघामुलकाची औषधे फवारून लोकांकडून व्याजाने पैसे काढून बाग चांगली जोपासली होती अनेक लोकांचे पैसे देणे घेणे या बागेवरती होते परंतु शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आसमानी सुलतानी संकट आले आणि बागेचे होत्याचे नव्हते झाले संपूर्ण दीड एकर बाग जमीन उध्वस्त झाली बागेला लागलेला माल माती मोल झाला त्यामुळे जनार्दन थोरात यांच्यावर आसमानी सुलतानी संकटच आले आठ दिवसानंतर बाग जाणार होती हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरकावून घेतला त्यामुळे शेतकऱ्यावरती जगावंकी माराव हाच प्रश्न निर्माण झाला आहे प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अशा आसमानी सुलतानी संकटांना वेळोवेळी तोंड द्यावा लागत आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे आणि त्याचे वार्षिक तोटा होत असल्यामुळे काय खावे आणि कसे जगावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जनार्दन थोरात या शेतकऱ्याचे म्हणणे आहे की बागेचा पंचनामा होऊन शासनाने आम्हाला मदत केली पाहिजे मदत नाही झाली तर आमच्या कुटुंबावरती मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.एकीकडे सुरू असलेल्या नोकरदारांना पेन्शन मिळावी यासाठी सर्व अधिकारी संपावर गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी एक ही अधिकारी आलेला नसल्यामुळे शेतकरी नाराज होत आहेत सरकारला नोकरदार महत्त्वाचा का शेतकरी महत्त्वाचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.