वादळी वाऱ्याने विद्युत तार पडली नदीतपाणी पिताना करंट लागून एका रेडकासह चार म्हशी दगावल्या

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग – बार्शी तालुक्यातील इर्ले येथील अंकुश राजेंद्र शिंदे हे रानातून घरी येत असताना भोगावती नदीच्या काठावर आपल्या म्हशींना पाणी पाजत असताना वादळामुळे त्यांना तुटलेल्या विद्युत वाहीनींच्या तारामुळे करंट लागल्याने एका रेडकासह चार म्हशी दगावल्या आहेत सुदैवाने अंकुश शिंदे यांना पाण्यात करंट असल्याची चाहूल लागल्याने या दुर्घटनेतून अंकुश शिंदे हे बचावले आहेत या दुर्घटनेची तात्काळ माहिती मिळताच सुर्डी एम एस ई बीचे कनिष्ठ अभियंता अनुप ओव्हाळ यांनी घटना स्थळी जाऊन पहाणी केली त्यानंतर वैराग येथील पशूवैद्यकिय अधिकारी रामचंद्र पाटील यांनीही भेट देऊन पोस्टमार्टम केले आहे सदर घटनेमुळे अंकुश शिंदे यांना सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेमुळे माझे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे यामुळे माझा दुध उत्पादन व्यवसाय बंद पडल्याने संसार उघड्यावर पडला आहे परंतू मी यातून बचावलो आहे तरी शासनाकडून मला मदतीची अपेक्षा आहे – अंकुश शिंदे

पावसाळ्याचे दिवस असल्याने जोराचे वादळ सुटले होते त्यामुळे शेतीकडे पुरवठा करणारी विद्युत तार नदीजवळ तुटल्याने विद्युत प्रवाह पाण्यात उतरला त्यामुळे ही घटना घडली आहे सदर घटनेची मला माहिती मिळताच तात्काळ मी घटना स्थळी पहाणी करून सविस्तर अवहाल वरिष्ठांकडे पाठवला आहे – अनुप ओव्हाळ , कनिष्ठ अभियंता, सुर्डी

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या