सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्याची मागणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील गौडगाव, वैराग आणि सुर्डी मंडळात सतत ८ ते १० दिवस झाले पाऊस पडत आहे, या मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बार्शी तालुक्यात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, जून जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती.

आधीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने हवालदीक झालेला शेतकरी आता अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन पिकात मोठया प्रमाणात पाणी साचल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सोयाबीन पीक कसेबसे येण्याच्या मार्गावर असतानाच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास पावसाने फिरवल्यामुळे बार्शी तालुक्यातील गौडगाव, वैराग आणि सुर्डी मंडळातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.

तहसीलदार यांनी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे, त्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी राहुल भड, दादा जाधवर, भास्कर काकडे, विनायक भोसले, अनिल घुगे, कल्याण भोसले आदी शेतकऱ्यांनी तहसीलदार एफ.आर. शेख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या