गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानवाला अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे : पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे
बार्शी : विश्वभूषण,प्रज्ञासूर्य,महामानव,बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष नागनाथ फोके तर प्रमुख पाहुणे गुळपोळी पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे तर प्रमुख उपस्थिती गणेश लंगोटे होते. प्रमुख पाहुणे बाळकृष्ण पिसे आणि नागनाथ फोके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
प्रमुख पाहुणे बाळकृष्ण पिसे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे, शिका , संघटित , संघर्ष करा आशा संदेश दिला. बाबासाहेबानी सर्व घटकासाठी कार्य केले.आजच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. भीम जयंती ही विचारांची साजरी झाली पाहिजे. आपल्या देशाला मोठी राज्यघटना दिली. ते महामानव संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी उपाध्यक्ष रणजीत चौधरी, किरण खुरंगळे, अमित काळे , सुमित माली, समाधान चौधरी, गुलाब शेख , रामकृष्ण चिकणे , गणेश लंगोटे , बाळकृष्ण पिसे , नागनाथ फोके इतर मान्यवर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर अभारप्रदर्शन रणजीत चौधरी यांनी केला.