नामांकित उद्योजिका संगिता सवालाखे राज्यपालांतर्फे पुरस्कृत कृषी क्षेत्रातील नाविन्यपुर्ण संशोधनासाठी उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ : कृषी क्षेत्रातील नाविन्यपुर्ण संशोधनासाठी कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे दिला जाणारा उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार यावर्षी यवतमाळ जिल्हयातील नामांकित उद्योजिका संगिता दिपक सवालाखे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या २५ वर्षापासुन सुरू असलेल्या जैविक शेती, सेंद्रिय शेतीतील नाविन्यपुर्ण संशोधनासाठी त्यांना आंतरराष्ट्रिय जागतिक महिला दिनी देण्यात आला. सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाध्ये कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे राज्य मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव मनिषा वर्मा, आयुक्त रामास्वामी एन हे उपस्थित होते.संगिता सवालाखे हया विदर्भ बायोटेक लॅब, यवतमाळच्या संचालिका असुन त्यांचा कृषी
कार्यामध्ये नावलौकीक आहे. जवळपास २५ वर्षापासुन त्यांचे जैविक शेती, सेंद्रिय शेती मध्ये संशोधन सुरु असुन त्यांची सन २००१ रोजी आय. पी. एम. कोर्स, इस्त्राईलसाठी निवड झाली होती. सन २००२ साली डब्ल्युडब्यूएसएफ अवार्ड युनेस्को, जिन्हेव्हाने पुरस्कृत करण्यात आले आहे. सन २००६ चा महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्काराने सुध्दा सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सन २०१८ चा ऑनर ऑफ एक्सलेंस, मिनिस्ट्री ऑफ अग्रीकल्चर, दिल्ली आणि सन २०१८ रोजी अटल सन्मान पुरस्कार, झी २४ तास तर्फे प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल कौशल्य विकास, रोजगार , उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या