जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खा. ओम राजेनिंबाळकर यांचा आज वैराग येथे जनता दरबार

B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील व बार्शी शहर तालुक्यातील जनतेच्या ग्रामस्थांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा जनता दरबार वैरागमध्ये होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण काकडे यांनी दिली.
ग्रामीण जनतेच्या अनेक समस्या बराच काळ लोटला तरी तशाच प्रलंबित राहतात त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त होते या त्रासाला कमी करण्यासाठी प्रशासनातील सर्वच खात्यांचे संबंधित अधिकारी बोलावून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी बार्शी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वैराग मध्ये बुधवारी जनता दरबार भरवला आहे. यावेळी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.बार्शी तालुक्यात खासदारांचा जनता दरबार पहिल्यांदाच भरत आहे…… बार्शी तालुक्यातील समस्याग्रस्त शेतकरी, कामगार ,मजूर, नोकरदार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आबाल वृद्धांचे ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता, प्रशासन आणि नेतृत्व या तिन्हींमध्ये संवाद साधला जाणार आहे. यासाठी शिवसेना बार्शी तालुका प्रमुख प्रवीण काकडे यांच्या प्रयत्नातून वैराग मधील मातोश्री मंगल कार्यालयात दुपारी एक वाजता खासदारांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी ,महसूल विभाग, सामान्य विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग,वन विभाग, पोलीस विभाग, बँक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या ज्या शेतकरी आणि ग्रामस्थांना शासकीय यंत्रणेकडून कोणत्याही स्वरूपाच्या समस्या असतील तर त्यांनी त्या समस्या जनता दरबारात येऊन मांडाव्यात असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.