मागेल त्याला काम नव्हे तर पाहिजे ते काम मिळणार रोजगार हमी योजनेअंतर्गत ….

0

B1न्यूज मराठी नेटवर्क
साकत : बार्शी पंचायत समितीच्या सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांचे प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. हे शिबीर तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन कक्षा अधिकारी सुधाकर अडसूळ यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमाना पुष्पाहार घालून दिपज्वलन करून प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.
यावेळी नव्याने सुरू झालेल्या शरदचंद्रजी पवार समृद्धी योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामाची माहिती रोजगार सेवक यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जाते. मागेल त्या सर्वांच्या हाताला काम मिळावे तसेच लाभार्थी समृद्ध ही या योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, व्यवसायिक व भूमिहीन कुटुंबियांना लखपती करण्याच्या उद्देशाने फक्त मागेल त्याला काम नाही तर पाहिजे ते काम या उक्तीप्रमाणे १० वर्षाचे नियोजन आराखड्यात कामांचा समावेश करून मी समृद्ध तर गाव समृद्ध पर्यायाने महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना साध्य होईल.
या हेतून पालघर जिल्ह्याचा विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा या गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन योजनेची अमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्य्क आणि ग्रामरोजगारसेवक यांना प्रवृत्त करण्यासाठी प्रशिक्षण हे प्रशिक्षण दिले जात आहे. बार्शी तालुक्यातील 130 ग्रामरोजगारसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचे नियोजन करण्यात आले. एन एम जानराव व किशोर मादळे हे तज्ञ प्रशिक्षण देत आहेत. तीन दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी भोयरे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून तेथे क्षेत्र भेट दिली जाणार आहे. पहिल्या दिवशी व तिसऱ्या दिवशी सभागृहात मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी ऐ कराड, आर एम जगताप, एस बी शिंदे, एपीओ व्ही सी कापसे सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या