खरीप हंगामातील 4 वंचित मंडळासाठी 3 कोटी 39 लाख अनुदान मंजूर करा : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : बार्शी तालुक्यातील 2021 च्या खरीप हंगामातील 4 वंचित मंडळांना 39 कोटी 50 लक्ष अनुदान मंजूर करावे अशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मागणी केली.आज दि. 04/10/2022 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली सदर बैठकीत बोलताना 2021 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी मुळे बार्शी तालुक्यातील नारी, सूर्डी, वैराग आणि खांडवी या मंडळात शेतीपिकाचे नुकसान झाले असताना देखील ही मंडळे वगळली होती त्यानंतर या मंडळाचा मदतीचा प्रस्ताव 39 कोटी 50 लाख रुपयांचा जिल्हाधिकारी यांचेकडे तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आला त्यात त्रुटी काढण्यात आल्या होत्या च्या त्रुटी ८ दिवसात पुर्ण कराव्यात व तो प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याबाबत पालकमंत्री महोदयांना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विनंती केली व सदरचा प्रस्ताव सर्व त्रुटी सह जिल्हाधिकारी यांनी 8 दिवसात शासनाकडे पाठवणार असल्याचे यांनी मान्य केले.
जिल्हा नियोजन समितीचा कपात केलेला 10 टक्के निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला समर्पित केला आहे तो जिल्हा नियोजन समितीला परत द्यावा, राष्ट्रीय जलजीवन योजनेतील जिओ टॅगिंग ची अट रद्द करून पेयजल योजनेतील आणि जलजीवन योजनेतील सर्व कामे दर्जेदार व्हावी त्या कामाबाबत कसल्याही प्रकारची तडजोड करू नये. तसेच ज्या गावांच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने नागरिक वाहून गेले व संपर्क तुटला अशा पुलाचा त्यामध्ये श्रीपत पिंपरी, हिंगणी, नारेवाडी, उपळे दु. तसेच अन्य ठिकाणचा सर्व्हे करावा व अशा पुलाची कामे नाबार्ड मध्ये मंजूर करावीत अशी विनंती नियोजन च्या बैठकीत केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या