कोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढाल; कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी ‘जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय महोत्सव राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती सदन येथे पार पडत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज, २१ मार्च रोजी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड आणि उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाला ग्राहकांनी पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला असून, अवघ्या एका दिवसात तब्बल ५० लाख रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे.5000या धान्य महोत्सवामध्ये ग्राहकांना शेतकऱ्यांकडून थेट १००% शुद्धतेचे धान्य आणि ओडीओपी (ODOP) व जीआय (GI) मानांकन प्राप्त दर्जेदार शेतीमाल खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, काकवी, पाटगावचा मध, आजरा घनसाळ आणि विविध प्रकारचे तांदूळ थेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इतर जिल्ह्यांतील प्रसिद्ध शेतीमालही ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये सोलापूरची ज्वारी, साताऱ्यातील ‘फळांचे गाव’ असलेल्या धुमाळवाडी येथील द्राक्षे, अंजीर, वॉटर ॲपल, कलिंगड, पेरू, डाळिंब, खरबूज, वाईगाव हळद, खपली गहू, पाटगाव मध, देशी अंडी आणि विविध प्रक्रियायुक्त पदार्थांचा समावेश आहे. महोत्सवामध्ये बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले ‘रेडी टू सर्व्ह’ खाद्यपदार्थ आणि कृषी विभागाच्या विविध प्रकल्पांतर्गत तयार झालेले प्रक्रियायुक्त पदार्थही ग्राहकांना पाहण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.5000आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उद्या, २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता कृषी विभागातर्फे एका विशेष ‘पौष्टिक तृणधान्य रॅली’चे आयोजनही करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्यांच्या वापराबाबत जनजागृती करणे आणि महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही बाईक रॅली प्रामुख्याने महिला बाईक रायडर्सची असणार आहे. रॅलीचा मार्ग दसरा चौक, बिंदू चौक, उमा थिएटर चौक, बागल चौक, जनता बाजार चौक ते व्ही. टी. पाटील स्मृती भवन (समारोप) असा राहील. महिला शेतकऱ्यांचा सन्मान आणि आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.50000शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या दिवसाच्या प्रचंड यशानंतर, सर्व कोल्हापूरकरांनी २२ मार्च रोजीही या धान्य महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन दर्जेदार शेतीमालाची खरेदी करावी आणि या उपक्रमास असाच उदंड प्रतिसाद द्यावा. तसेच, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपला दर्जेदार शेतीमाल या प्रदर्शनात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या