भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहिदांना अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड शहीद भगतसिंग , सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन करणारी सभा घेण्यात आली. यावेळी शहीद यांच्या प्रतिमेला कामगारांच्या मुलांच्या हस्ते पुष्पहार करून सभेची सुरुवात झाली सभेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे हे होते.
यावेळी कॉम्रेड प्रविण मस्तुद म्हणाले ” शाहिद भगतसिंगाच्या घरामध्ये असणारे क्रांतिकारी वातावरण व राष्ट्रीय चळवळीचा प्रभाव भगतसिंगांवर होता. पुढे रशियन कामगार क्रांती, जगभरातील क्रांत्या, जगातील क्रांतिकारकांचे विचार, मार्क्सवाद लेनिनवादाचा अभ्यास यामुळे ते वर्ग संघर्षाचे समर्थक बनले, देशात क्रांती घडवून आनून श्रमिक वर्गाने सत्ता हस्तगत करावी, व भांडवली व्यवस्था उध्वस्त करून टाकावी यासाठी ते नौजवाणन सभा, किर्ती किसानसभा, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून काम करत राहिले, त्यांनी कम्युनिस्ट पक्ष संस्थापक मुजफ्फर अहमद यांच्याशी जेलमधून बाहेर आल्यानंतर संपर्क साधला होता, देशाची सत्ता श्रमिकांनी ताब्यात घ्यावी ही त्यांची भावना होती, त्या दिशेने कामगार, शेतकरी वर्गाने काम करावे.”
सभेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले “इंग्रजांच्या काळामध्ये सरकारचे जे वर्तन होते तेच वर्तन आजच्या धर्मांध सत्ताधीशांचे आहे, श्रमिक वर्गाला दाबण्यासाठी हरतऱ्हेचे मार्ग सरकारा अवलंबत आहे, इंग्रजांना विरोध नकेलेल्या विचारधारेचे लोक सध्या सत्तेवर आहेत त्याचमुळे सरकार इंग्रजांना प्रमाणे जनविरोधी कायदे आणत आहे, जनतेचा आवाज दाबण्यासाठी भाजपा आनत असलेला जणसुरक्षा कायदा हा त्याचा एक भाग आहे, या विरोधात 3 एप्रिल रोजी बार्शीत निदर्शने आंदोलन होतील त्यात जणतेने सहभागी व्हावे हीच शहिदांना श्रद्धांजली असेल.”
मंचावर कॉम्रेड लहू आगलावे, भरती मस्तुद, भारत भोसले, दलिता अधिकारांदोलनाचे बालाजी शितोळे, अनिरुद्ध नकाते, आनंद गुरव, श्रीकांत सोरेगावकर, भारत चव्हाण, संपत खताळ, मनीषा होनकळस , चंदू देशमुख आदि उपस्थित होते.