वानखेडेवर विजयी ‘अभिषेक’, मुंबईत भारताने मालिका जिंकली; इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव

0

शमीला सूर गवसला; बॅटिंगनंतर अभिषेकचा गोलंदाजीत जलवा, टीम इंडियानं मोठ्या फरकानं दिमाखात जिंकला सामना

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ‘शर्मा’जींच्या अभिषेकची दादागिरी चालली. 135 धावांच्या वादळी खेळीत अभिषेकने अनेक विक्रम मोडले आणि त्यानंतर गोलंदाजीत कमाल करताना इंग्लंडला दोन धक्केही दिले. भारताच्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 97 धावांत तंबूत परतला. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका 4-1 अशी जिंकली. अष्टपैलू कामगिरी करणारा अभिषेक सामनावीर ठरला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या