तृतीय वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
माढा : 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व पॉसिबल एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर सेंटरचा तृतीय वर्धापन दिन उपळाई बुद्रूक येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. सुहास पाटील सर रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते तसेच मदर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सचिव ज्योतीताई कुलकर्णी, गडचिरोली येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव सोलापूर येथे कार्यरत असणाऱ्या राज्यकर निरीक्षक कु. धनश्री हनुमंत डुचाळ, सेवानिवृत्त शिक्षक कुंडलिक माळी, कुर्मदास सहकारी कारखान्याचे संचालक दिपक आबा देशमुख, रासपचे गोरख वाकडे, सरपंच सुमन शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॉसिबल एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर, उपळाई बुद्रुकचे सीईओ अतुल ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात ‘गोरगरिबांच्या मुलांना ज्ञानाची दारे खुली व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर ट्रेनिंग देण्याचा वसा घेतला तसेच उपळाई बुद्रुक हे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा केंद्र निर्मिती केल्यास गावकऱ्यांनी शारिरीक व मानसिक तयारीने असावे असे प्रास्ताविक केले.
प्रमुख पाहुणे यांचे सत्कार सौ. माळी मॅडम, सौ. प्रगती व श्रीकांत क्षिरसागर, मुस्तफा काझी, अतुल सर, श्रीकृष्ण डुचाळ यांनी केले. त्यानंतर प्राध्यापक सुहास पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करताना ‘विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घ्यावे. आपल्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावावे व शिवीमुक्त गाव याचा संकल्प करावा’ असा मोलाचा सल्ला दिला.
पीएसआय अक्षय जाधव यांनी ‘विद्यार्थ्यांनी कष्टाची लाज न बाळगता धाडसाने पुढे गेले पाहिजे’ असे प्रतिपादन केले. तसेच विक्रीकर निरीक्षक कु. धनश्री डुचाळ यांनी ‘महिलांनी पुढे आले पाहिजे’ असा मोलाचा सल्ला दिला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुंदर हस्ताक्षर, निबंध लेखन व वक्तृत्व आदी स्पर्धा परीक्षांचे एकूण २० विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरित केले.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच दत्ता लवटे, माजी उपसरपंच बसवेश्वर आखाडे, जि. प. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शेंडे, सोसायटी सदस्य दत्तात्रय राऊत, माळी समाज ता अध्यक्ष दत्ता शिंदे, स्वप्नील झाडबुके, सुमित देशमुख, भगवान व तानाजी जाधव, विद्यार्थी व पालक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बबन सोनार यांनी केले. तर आभार गोरख वाकडे यांनी मानले.