वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन काळाची गरज : मुख्याध्याकारी बाळासाहेब चव्हाण

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे.हे काम बार्शीची वृक्ष संवर्धन समिती गत अणेक वर्षापासुन इमाने इतबारे करत आहे.सदरची बाब खरोखरच कौतुकास्पद आहे., असे प्रतिपादन बार्शीचे मुख्याध्याकारी बाळासाहेब चव्हाण यांनी केले. ते तालुक्यातील बळेवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी कडून श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात आयोजित महावृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी रवींद्र राऊत,डॉ.देवदत्त मोरे, डॉ. राहुल मांजरे, महेश यादव, पत्रकार गणेश गोडसे,भगवान लोकरे, साधना गोडसे, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे,नानासाहेब कदम ,गौतम आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता वृक्ष लागवड सुरू करण्यात आली.
मान्यवरांच्या उपस्थितीत विविध जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली.यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे उमेश काळे, एचडीएफसी बँकेचे मॅनेजर अनमोल पसारे, सचिन शिंदे राहुल तावरे अतुल पाडे अक्षय घोडके , महेश बकशेट्टी, राणा देशमुख, योगेश दरुरमठ, महेश पायघन, योगेश गाडे, हर्षद लोहार , सुनील फल्ले , प्रज्वल मोरे, अक्षय भूईटे, समर्थ तुपे , प्रथमेश नलवडे, चंद्रकांत चोबे, गणेश रावळ , बुगडे सर सौदागर मुळे मनोज कुलकर्णी,डॉ.वासुदेव सावंत ,उमेश घुळवे, शशांक भिस्ते, प्रीतीश मंठालकर आदी उपस्थित होते.