तीस वर्षांनी भेटले मित्र- मैत्रिणी! गहिवरले जुन्या आठवणींनी विद्यामंदीर

विद्या मंदिर येथे जमलेले १९९३च्या बॅचचे मधील विद्यार्थी…….
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : शाळेचे शिक्षण झाल्यानंतर ३० वर्ष झाली. इतक्या वर्षांत प्रत्येकजण आपापल्या संसार, उद्योग, व्यापार, नोकरीत गुंतलेला. प्रत्येकाचे ठिकाणही वेगळे, मात्र एकत्र येण्याची इच्छा असेल तर एवढ्या वर्षांनीही जुने मित्र मैत्रिणी भेटू शकतात, हे साध्य केले वैराग मधील विद्यामंदीर हायस्कूलच्या १९९३ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी. या सर्वांचे स्नेहसंमेलन ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत म्हणजे विद्यामंदिर मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. जुन्या आठवणींनी प्रत्येकाला गहिवरून आले.
संदिप बेताळे, इस्माइल पटेल यांनी व्हॉट्सअप वर या सर्वांचा ग्रुप बनवला. यातून ८६ मित्र-मैत्रिणींना एकत्र केले. नंतर गुरुप्रसाद सोपल, किरण कदम, श्रीधर खेंदाड यांनी या कार्यक्रमाची तयारी सुरू केली. कार्यक्रमाला मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली येथून ही सर्व मित्रमंडळी हजर झाले. यातील बहुसंख्य लोक आजी-आजोबा झाले होते. त्यामुळे आपल्या वर्ग मित्रांना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या गगनात मावत नव्हता. कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देऊन प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ भोई, दिलीप सोपल, शामराव पवार , कल्याण करंडे ,शरद झाडे, महेश कांबळे ,कालिदास शिंदे सिद्धू पाटील, कस्तुरी दराडे, दमयंती जगदाळे, सुरेखा घुगे, कांती कुलकर्णी,जयश्री करपे आदी शिक्षक वृन्द उपस्थित होते. यावेळी मौलाना आझाद विचार मंचाचे जिल्हा अध्यक्ष इस्माईल पटेल, डॉ रमेश खेंदाड,प्रोफेसर आनंद काशिद, संदिप बेताळे, प्रसाद सोपल, अजित मोहिते, आपा गावसाने, मौला तांबोळी, सचिन साकतकर, संतनाथ खेंदाड, श्रीधर खेंदाळ, अलताफ मनियार, प्रसाद देंशपांडे, विवेक गुंड, आतमाराम जाधव, सोमनाथ पिसे, प्रशांत गाडे, किरण कदम, संतोष माळी, हसन सय्यद, दिनेश भिसे, पांडूरंग कुलकर्णी, प्रशांत गाडे, शैलेश हेंगे, दशरथ कदम, लक्ष्मण कदम, एस,एस, कदम,नाना पवार, शामा माळी, किशोर महमाणे,प्रशांत साखरे,धनंजय गरड,प्रदिप काशिद तसेच हेमा आहीरे,विजया मोरे,हरशा गांधी,दीपा कुलकर्णी, मनिषा देशमुख, संध्या मोहिते, शुभांगी मोहिते, रेणुका सोपल ,सारिका गांधी आदी उपस्थित होते. प्रस्ताविक दिपा कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन मनिषा देशमुख तर आभार प्रदर्शन संध्या मोहिते यांनी मानले.