पदवी बघून लोकांनी मोदींना निवडून दिले नव्हते; नाव न घेता अजितदादांनी राऊतांना सुनावले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : २०१९ रोजी महाविकास आघाडी  सरकारच्या स्थापनेवेळी उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंचेचंच नाव पुढे केले होते. पण शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?? असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. मात्र सावंत त्यांच्या पण या ‘रिक्षावाला’ शब्दाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांनी कायमच सर्वांचा आदर केला आहे. त्यामुळे रिक्षावाला हा शब्द पवारांचा नाही. तो माझा शब्द असल्याचे आता स्वतः अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या सुरु असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरुन चांगलेच राजकारण रंगले आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना दिसत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरूनही अजित पवारांनी संजय राऊतांचे नाव न घेता त्यांना खडे बोल सुनावले. २०१४साली नरेंद्र मोदी यांची पदवी पाहून लोकांनी त्यांना निवडून दिलेले नव्हते. २०१४ साली स्वत:च्या करिष्म्यावर ते निवडून आले होते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जो भाजपची लाट निर्माण झाली होती त्याचे सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना जाते. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५चे बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या राज्यातील आगामी नेतृत्वाबाबत सूचक विधान केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या