राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकारच्या निषेधार्थ, सोलापुर शहर काँग्रेसचे आंदोलन

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : केंद्रातील मोदी सरकारने राहुलजी गांधी यांची लोकसभा सदस्यता रद्द करण्यात केली. या मोदी सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधात, आणि राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोदी सरकारच्या विरोधात, राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, चौकीदार चोर है, पहले लढे थे गोरो से अब लड़ेंगे चोरों से, मोदी अदानी भाई भाई देश बेच के मलाई खाई, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, राहुलजी गांधी तुम संघर्ष करो, जो सरकार निक्कमी है वो सरकार बदलनी है, भाजपा हटाओ देश बचाओ अश्या जोरजोरात घोषणाबाजीमुळे परिसर दणाणुन गेला.
यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, अनेक भाजपा नेते महापुरुषांबद्दल, काँग्रेस नेत्यांबद्दल, अपशब्द वापरले असताना सुद्धा आजपर्यंत एकालाही शिक्षा झाली नाही. पण मोदी नावाने अपशब्द वापरले म्हणून काल गुजरात मधील कोर्टाने राहुलजी गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा केली होती आणि अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत ही दिली होती असे असताना सुद्धा आज रोजी पंतप्रधान मोदींच्या दबावामुळे लोकसभा अध्यक्षामार्फ़त सचिवालयाकड़ून त्यांची खासदारकी रद्द केली मोदी सरकारच्या या हुकुमशाही निर्णयाविरुद्ध सोलापुरसह देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि जनता आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी भारत जोडोच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करत आहेत आणि मोदी सरकारच्या भोंगळ, भ्रष्टाचारी, तुघलकी, हुकुमशाही कारभाराराचा फर्दाफ़ाश करत आहेत तसेच मोदी आणि जनतेचे लाखो कोटि पैसा बुड़विणाऱ्या उद्योगपती अदानीच्या संबंध उघड़ केला. यामुळे मोदी सरकार घाबरून गेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता जाईल म्हणून घाबरून गेली आहे. त्यामुळे राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या देशात मोदी सरकार आल्यापासुन अनेक मोदी नावाचे व इतर उद्योगपती जनतेचा लाखो कोटी पैसा लुटून परदेशी पळून गेले आहेत, तसेच गुंड बलात्कारी, भ्रष्टाचारी आरोपी उजळ माथ्याने वावरत असताना आपल्या देशात चोराला चोर म्हटले तर शिक्षा होत आहे म्हणून देशभरात जनतेत असंतोष पसरला असून राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या या हिटलरशाही वृती हुक़ूमशाही कारभाराविरुद्ध जनता पेटून उठेल आणि एक नवी क्रांती घडेल काँग्रेस पक्षाने चले जाव म्हणत इंग्रजांना घालवले या मोदी सरकारला ही घालवेल असे म्हणाले.
या आंदोलनात जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, शिवा बाटलीवाला, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर सुशीलाताई आबूटे, आरिफ शेख, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, अंबादास बाबा करगुळे, भीमाशंकर टेकाळे, अँड केशव इंगळे, NK क्षीरसागर, शकील मौलवी, अशोक कलशेट्टी, अंबादास गुत्तिकोंडा, विश्वनाथ साबळे, वाहिद बिजापुरे, हसीब नदाफ, हारून शेख, जेम्स जंगम, सिद्राम अट्ठेलुर, तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, नागनाथ कदम, सिद्धराम चाकोते, रफ़ीक चकोले, राजन परदेशी, प्रवीण जाधव, विश्वराज चाकोते, अप्पासाहेब बगले, VD गायकवाड, एजाज बागवान, युवराज जाधव, चक्रपाणी गज्जम, प्रवीण वाले, दीनानाथ शेळके, विवेक कन्ना, नासीर बंगाली, मल्लीनाथ सोलापुरे, कुणाल गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, नूर अहमद नालवार, सुमन जाधव, अंजली मंगोडेकर, शोभा बोबे, प्रमिला तुपलवंडे, लता गुंडला, संध्या काळे, चंद्रकांत टिकके, राजाभाऊ महाडिक, सुभाष वाघमारे, श्रीनिवास पोटाबत्ती, विवेक इंगळे, महेंद्र शिंदे, आदित्य म्हमाने, धर्मराज गुंडे, इरफान शेख, जितराज गरुड़, शोहेब कडेचुर, वसिष्ठ सोनकांबले, श्रीशैल रणदिवे, अप्पाजी गायकवाड, मुमताज तांबोळी, मुमताज शेख, दुर्योधन मस्के, अप्पासाहेब सलगर, प्राजक्ता घाटे, अनिता भालेराव, आशुतोष वाले, अजिंक्य पाटिल, मनोहर चकोलेकर, रेखा बिनेकर, सुनीता बेरा, सैफन मकानदार, मीना गायकवाड, अकबर शेख, इब्राहिम कलबुर्गी, लता सोनकांबले, शकूर शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.