अ‍ॅड. विवेक गजशिव यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या अन्यथा वंचित आघाडी राज्यभर तीव्र आंदोलन करेल – जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.विवेक गजशिव यांच्यावर बार्शी शहर पोलिस ठाणे येथे दाखल झालेला गुन्हा खोटा आहे,तो लवकरात लवकर तपास करून मागे घेण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचा इशारा बार्शी तहसील कार्यालय येथील धरणे आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिला.पुढे बोलताना गायकवाड म्हटले की , अ‍ॅड.गजशिव हे एकटे नाहीत त्यांच्या मागे प्रकाश आंबेडकर ठामपणे उभे आहेत.एका सच्चा आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे आंबेडकर हे चिडले आहेत.वेळ पडली तर मी स्वतः बार्शीला येणार असल्याचा निरोप बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी पोलिस प्रशासनाचाही गायकवाड यांनी निषेध केला.पोलिस प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून खोटे गुन्हे का दाखल करत आहेत.दुसरीकडे गजशिव यांच्या आईवर हल्ला होऊन ग्रेव्हीअस सर्टिफिकेट येऊनही गुह्यात वाढ न करता गुह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिस अधिकारी आणि तपासाधिकारी करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णराज बारबोले,विक्रम सावळे, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे दिपक आंधळकर, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, प्रहारच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेश चव्हाण, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. हर्षवर्धन बोधले, वंचितचे जिल्हा संघटक शोएब सय्यद, सचिव अमोल शिंदे, वंचितचे तालुकाध्यक्ष प्रा.भारत कदम, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निवेदनात अ‍ॅड. गजशिव यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. गुन्हा घडल्याची वेळ दिली त्यावेळी गजशिव हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये होते. तपासाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात यावे. अ‍ॅड. गजशिव यांच्या आईवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर भादवी कलम -307 ,326 नुसार गुन्हा दाखल करावा. ग्रेव्हीअस सर्टिफिकेट येऊन सुद्धा पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून हल्ल्याची तीव्रता कमी करण्यात येत आहे. वरील मागण्या मान्य न झाल्यास पुढे आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष भारत कदम यांच्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन नायब तहसीलदार संजीवन मुंडे, आणि बार्शी पोलिस स्टेशननला निवेदन देण्यात आले.
यावेळी बाळासाहेब आणि उद्धव गट शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रहार संघटना,काँग्रेस, रिपाइं, डेमोक्रेटिक पार्टी, सावता परिषद, उडान फाऊंडेशन या संघटना आणि पक्षांनी धरणे आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी वंचितच्या महिलाध्यक्ष रेखा सरवदे, शिवसेनेच्या अ‍ॅड. उषा पवार, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्ष दैवशाला जाधवर, वंचितचे उपाध्यक्ष भैरवनाथ शिंदे, किशोर ढोले, सुहास भालेराव, रोहित बोकेफोडे, लक्ष्मण पालके, रामकिसन शीलवंत, बाळासाहेब सरवदे, स्वप्निल लंकेश्वर, सूर्या मस्के, अमोल भालेराव, जमील खान, आशीष शिंदे, सूरज बगाडे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या