वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या उपक्रमाची O M G बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरात गेली चार वर्षा पासुन पर्यावरण बाबतीत काम करणार्या वृक्ष संवर्धन समिती च्या एका उपक्रमाची O M G बुक ऑफ रेकॉर्ड मध्दे नुकतीच नोंद झाली.याचे प्रमाणपत्र बार्शी तालुक्याचे प्रथम नागरीक आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते स्विकारले.भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच औचित्य साधुन ९ ऑगष्ट क्रांती दिना निमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी मार्फत हर घर तिरंगा हर घर एक पेड हा उपक्रम राबवण्यात आला.या मध्दे वृक्ष संवर्धन समिती मार्फत बार्शी शहर व तालुक्यातील नागरीकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना आपल्या अप्तेष्ठांना पत्र लिहुन एक झाड लावण्याचे अवहान करण्यात आले होते.
या उपक्रमाला बार्शी शहर व परीसरातुन प्रचंड प्रतिसाद मिळाला व विक्रमी दहा हजार पंचाहत्तर पत्र बार्शी तील नागरीकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी लिहली.आणि आपल्या प्रिय व्यक्तिला एक झाड लावण्याची विनंती पत्रा द्वारे केली.अशा प्रकारे एकाच दिवसात एका विषया वर पत्र लिहण्याचा एक विक्रम झाला याची नोंद ओ.एम.जी.बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली.
याचे प्रमाण पत्र बार्शी तालुक्याचे प्रथम नागरीक या नात्याने आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते समिती च्या सर्व सदस्यांनी स्विकारले.या वेळी सचिन वायकुळे सर तसेच वृक्ष संवर्धन समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष म्हणाले गेल्या चार वर्षा पासुन वृक्ष लागवड व संवर्धन चळवळ वाढावी या साठी वृक्ष संवर्धन समितीने अनेक उपक्रम घेतले आहेत.
जसे की गच्ची वरील बाग परस बाग स्पर्धा,निबंध लेखन स्पर्धा,संक्राती निमित्त वाण म्हणुन देण्यासाठी मोफत फळांची रोपे वाटप,नवरात्री निमित्त दोन हजार जास्वंदीची रोपे वाटप आणी त्यातील च हर घर तिरंगा हर घर एक पेड या उपक्रमा मुळे बार्शी त सुरु झालेली चळवळ नक्कीच महाराष्ट्र भर पोहोचणार आहे.या उपक्रमात बार्शीतील सर्व शाळांनी सहभाग घेतला व भारतीय डाक विभागाने पन या उपक्रमात मोठे सहकार्य केले.
या वेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील वृक्ष संवर्धन समितीच्या सर्वच उपक्रमाच कौतुक केल आणि या विक्रमा मुळे बार्शीच नाव देश पातळीवर झळकेल असा विश्वास व्यक्त केला.शेवटी आभार सुधिर वाघमारे यांनी मानले.