उद्योगक्रांती अधिवेशनातून गाव खेड्यातील तरुण उद्योजक होईल – राजेंद्र पवार

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून उद्योग क्रांती अधिवेशन आयोजित केले होते या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना उद्योग क्रांती अधिवेशने बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी होत असतील तर याचा लाभ गाव खेड्यातील शेतीवर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक तरुणांनी घेतला पाहिजे आपल्या व्यवसायात ज्या जायचं आहे त्या व्यवसायाचा अभ्यास करावा त्याचबरोबर यश अपयश याची कारणे शोधावी त्यानंतर त्या व्यवसायामध्ये पाऊल ठेवा तुम्हाला उंच शिखरापर्यंत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही यासाठी हे अधिवेशन आयोजित केले आहे मला खात्री आहे. बार्शी तालुक्यातील तरुण या उद्योग क्रांती अधिवेशनाच्या माध्यमातून उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण या उद्योगाधिवेशनामध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत.
या अधिवेशनामध्ये सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले, यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव उपाध्यक्ष नंदन जगदाळे, नवनाथ कसपटे, राजभाऊ देशमुख, शिवाजी कादे,मकरंद निंबाळकर,युवराज काटे, लक्ष्मण संकपाळ, विनोद वाणी, विक्रम सावळे याचबरोबर या अधिवेशनाचे आयोजक संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आनंद काशीद संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये डॉ.संदीप तांबारे यांनी उद्योग अधिवेशनामध्ये आपल्याला उद्योग करण्याची माहिती दिली जाणार आहे. परंतु उद्योग करत असताना उद्योगांमध्ये पडल्यानंतर आपण निर्व्यसनी असणं फार गरजेचं आहे अनेकांची कुटुंब व्यसनामुळे बरबाद झाले आहेत अनेकांचे भले मोठे उद्योग धुळीस मिळाले आहेत. याची आपणास कारण शोधायला गेल्यानंतर फक्त व्यसन हे त्या अपयशाचं मूळ कारण असतं त्यामुळे आपण निर्व्यसनी होऊन व्यवसाय करावे तरच तुम्ही यशस्वी व्हाल असे प्रथम सत्राचे व्याख्याते डॉ.संदीप तांबरे आयुष्य असं मुक्ती केंद्र जामगाव यांनी आपले मत व्यक्त केले.
तर दुसऱ्या सत्राचे प्रमुख वक्ते उद्योग व सबसिडी कन्सल्टन रवींद्र ढवळे सीए पुणे यांनी उद्योग व्यवसाय करत असताना त्या क्षेत्रातील शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे त्या माध्यमातून अनेक योजनांना सबसिडी आहे की आपणास कशी घेता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि या उद्योगा अधिवेशनाच्या माध्यमातून जे तरुण आमच्याकडे येथील त्यांना आम्ही मदत चा हात देऊ आणि त्या तरुणांना उद्योगात उभा करू अशा प्रकारे मार्गदर्शन त्यांनी केले.
तिसऱ्या सत्राचे मार्गदर्शक प्राध्यापक किरण आवटे यांनी उद्योग क्रांती अधिवेशनात आलेल्या तरुणांनी आता उद्योगच करावा कारण शेती तोट्यात आहे ती परवडत नाही आणि नोकरी लागत नाही त्यामुळे उद्योगास शिवाय पर्याय नाही ते उद्योग करत असताना तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घ्या आणि उद्योगात पडा त्यामुळे आपलं कुटुंब व आपला गाव समाज सुधारल्या शिवाय राहणार नाही त्यात करिता आणि मदत करण्यास तयार आहोत असे मत व्यक्त केले.
चौथ्या सत्राचे प्रमुख वक्ते इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योजक किरणजी डोके यांनी महाराष्ट्रातील शेतमाल त्यातल्या त्यात सोलापूर व परिसरातील शेतमाला जागतिक दर्जावर खूप मागणी आहे मात्र आपला शेतकरी त्या दर्जाचा शेतमाल उत्पादित करत नसल्यामुळे योग्य तो भाव त्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनामध्ये त्यांचा आयुष्य व्यतित करत आहे त्यातून बाहेर पडण्याकरता शेतमाल जागतिक बाजारपेठेला जसा हवा आहे तसा उत्पादित करा नक्कीच तुम्ही आर्थिक सक्षम झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यासाठी इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला आम्ही आपल्या सोबत मदतीचा हात द्यायला तयार आहोत असे मत किरण डोके यांनी व्यक्त केले.
तर राजशेखर पाटील यांनी आपण शेती करत असताना सर्वजण धडपडतो कोणतं पीक लावावं याकरिता चिंतेत असतो यातूनच मला मिळालेला बांबू या पिकामुळे मी आणि माझं कुटुंब माझा परिसर आर्थिक सदन झाला आहोत अशाच पद्धतीने तुम्ही देखील शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करा आणि आर्थिक सक्षम व्हा बांबू लागवडीच्या बाबतीमध्ये जे मार्गदर्शन आपणास हवा आहे ते मी करण्यासाठी तयार आहे आणि आपणास मदतही करण्यासाठी तयार आहे असे राजशेखर पाटील यांनी मत व्यक्त केले.
तरी या सत्राचे अध्यक्ष नवनाथ कसपटे यांनी शेतीमधून अनेकांना करोडपती होता येतं लखपती होता येतं यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न केले आहेत आणि त्यातून अनेक जणांचा प्रपंच चांगला उभा राहिला आहे इथून पुढच्या काळात देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं मत यावेळी कृषी भूषण नवनाथ कसपटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी दिवसभर उपस्थित असणारे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव यांनी उद्योग क्रांती अधिवेशनासारखी नाविन्यपूर्ण उपक्रम बार्शी तालुक्यात आजच्या तरुण घेत आहेत खरोखर हे छत्रपती संभाजी महाराजांना आज मनस्वी आनंद होत असेल की माझ्या जयंतीनिमित्त आजचा तरुण योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे याच पद्धतीने मला स्वराज्यातील प्रत्येक मावळा अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आनंद काशीद व त्यांचे संपूर्ण टीम काम करते नक्कीच बार्शी तालुक्यातील तरुण योग्य मार्गाला गेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी डॉक्टर बी वाय यादव साहेब यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याते खंडू डोईफोडे यांनी केले तर आभार संभाजी ब्रिगेड बार्शी तालुका अध्यक्ष आनंद काशीद यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिवाजी गादे,विक्रम घाईतडक, पांडुरंग घोलप, अभिजीत मोरे,काशिनाथ शिंदे, बालाजी डोईफोडे, पंकज पिसाळ यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.